Friday 8 May 2020

Trek with Surendra


निसर्ग अनुभवायला पाहिजे. शहराच्या चार भिंतितराहून नाही, ना कि कोणाच्या लेखणीतून, कोणाच्या कवितेतून वा कोणाच्या अनुभवातून. तर दस्तुरखुद्द निसर्गात जाऊन तो अनुभवायला हवा. 
तिथे गेल्यावर 'जे पिंडी ते ब्रह्मांडी' ची सत्यता कळते. हिमालयाच्या उंच पर्वता मधून वाहणाऱ्या निर्झराच साधर्म्य आहे आपल्या धमन्या तुन वाहणाऱ्या रक्ताशी. पण ह्याची अनुभूती घ्यायला मन ताळ्यावर असल पाहिजे. हिमालयातली रौद्र वादळ अनुभवली कि याद येते मनात उठणाऱ्या भावनांच्या आवेगांची. 'ग्लेशीयर' मधली पडझड शांत चित्तानि ऐकली कि आठवतो पोटातुन येणारा ढापढुप आवाज. हिमालयातल्या डोंगरांचा पसारा प्रतिबिंबित करतो मनातल्या इच्छा आकांक्षान्ना. अस कितीतरी. मारुतीच्या शेपटी सारख, न संपणार. 
कोणा भक्ताला देव दगडाच्या सगुण मूर्तीत दिसेल, कोणी तो निर्गुणात अनुभवू शकेल, कोणाला आई च्या व्यक्त रूपात तो दिसेल तर कोणी नास्तिक तो नसण्यात त्याला पाहिल. पण भटके मात्र त्याला निसर्गाच्या विराट रूपातच पहात असणार. 
निसर्गाला प्रत्येकाची काळजी असतेच. एखाद फुल हिमालयाच्या रुक्ष वातावरणात उमलत, ह्यात अहंकार नाही म्हणूनच त्यात सौंदर्य प्रसवत. माणूसच साला हरामी प्रत्येक गोष्ट ego शी link करत असतो. 
तर, हे कायबाय अनुभवायला पाहिजे. शरीराची आणि मनाची मशागत करून बुड आडवाटेवर न्यायला पाहिजे.  

No comments:

Post a Comment